पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या धक्कादायक अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात त्यांच्या चार्टर्ड विमानाच्या लँडिंगच्या प्रयत्नात झाल्याचे पहिल्या अहवालांतून समोर येत आहे. उपमुख्यमंत्र्यांचे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते, तेव्हा लँडिंगच्या वेळी अचानक नियंत्रण सुटले आणि विमान अपघातग्रस्त झाले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी […]
टॅग: Maharashtra news
निष्काळजीपणाचा कळस! विक्रोळीत स्पीकर अंगावर कोसळून 3 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली असून निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी विक्रोळी पूर्वेकडील टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात घडली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी रस्त्याच्या कडेला मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. घटनेच्या वेळी तीन वर्षांची मुलगी खेळत असताना, अचानक तो स्पीकर तिच्या […]
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल होत असून नागरिकांना थंडी, पाऊस आणि वाढत्या तापमानाचा एकाच वेळी सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जाणवणारी तीव्र थंडी आता हळूहळू ओसरत असून, त्याचबरोबर अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागांवर होणार आहे. […]
निष्काळजीपणाचा कहर! दौंडमध्ये रोड रोलरखाली चिरडून 4 वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत मुलाचे नाव आर्यन जाधव असे असून ही घटना दौंड शहरातील […]
गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता
मुंबई : राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य व हमखास दर मिळावा, तसेच पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३–२८ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पासाठी ₹३.८८ कोटी […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 10 मोठे निर्णय, मुंबईकरांना मोठे गिफ्ट…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकरात आणखी एका वर्षाची सवलत, तसेच नगर विकास, नियोजन, महसूल व इतर विभागांशी संबंधित महत्वाचे निर्णय सामावले होते. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस मंत्रिमंडळातील अनेक सदस्य […]
चंद्रपूरच्या ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोन कामगारांचा मृत्यू
चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन बांबू तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शैसावी गावाचे रहिवासी बुधसिंग श्यामलाल मडावी (वय ४१) यांचा चंद्रपूर वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३८१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. […]
हृदयद्रावक! अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीतून ८ महिन्यांच्या चिमुकलीला उचललं, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या पलीकडे असलेल्या मजूर वस्तीमध्ये अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थलांतरित मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा […]
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने देशातील वीस मुलांचा सन्मान; महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा समावेश
नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(2025) सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील […]
राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट; परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश
मुंबई : महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले असून, त्यामध्ये १४,०६६ अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातांत १४,१८५ […]










