मुंबई : राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे […]
टॅग: maharashtra corona
कोरोनाचा लहान मुलांमध्ये वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचं […]
नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती भीषण, सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा
नांदेड : राज्यात कोरोनाने रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागले आहेत. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच चिंताजनक झाली आहे. सलग तिस-या दिवशी नांदेडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. नांदेडमधली गोवर्धन घाट स्मशानभूमीत दिवसभरात 17 अत्यंविधीची नोंदणी झालीय. काल याच स्मशानभूमीत 20 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती किती बिकट आहे याची कल्पना […]
महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण, मागील चार महिन्यानंतर हि सर्वाधिक संख्या
मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळालंय असं दिसत असतानाच पुन्हा एकदा राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे 9,855 रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन […]
1 मार्चपासून परिस्थितीनुसार गरज भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवाव्यात, शिक्षण विभागाचे निर्देश
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च […]





