मुंबई : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासांत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नसल्याबाबत […]
टॅग: Central government
शिवडी येथील चाळींच्या पुनर्विकासासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – अतुल सावे
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत असलेल्या शिवडी येथील 12 चाळींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल. त्यानंतर, केंद्र शासनाकडून या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. सदस्य अजय चौधरी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री सावे म्हणाले की, म्हाडाने वास्तूशास्त्रज्ञ […]
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थींच्या फेरनोंदीबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा
मुंबई : सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रपत्र ‘ड’ मध्ये तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थींपैकी पात्र असलेल्या लाभार्थींच्या नोंदी पुन्हा करण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले. ‘राज्यातील घरकुल योजनेतील अडचणी’ यासंदर्भात विधानसभा सदस्य समीर कुणावर यांनी […]
रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी
मुंबई : केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे […]
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपये
नवी दिल्ली : केंद्र सरकारने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज वितरित केले असून, महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या […]
५३ मॉडेल आयटीआयसह जागतिक कौशल्य केंद्र, एकात्मिक कौशल्य भवन उभारण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यास मान्यता
मुंबई : जागतिक बँकेच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून राज्यातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागात विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान १ मॉडेल आयटीआय आणि राज्यात मुलींसाठी 17 मॉडेल आयटीआय असे एकूण 53 मॉडेल आयटीआय निर्माण करण्यात […]
ताजमहाल आणि कुतुबमिनारसह देशातील सर्व स्मारकांमध्ये 15 ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेश, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशभरातील सर्व स्मारके, संग्रहालये आणि पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून हा प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारने यानिमित्ताने मोठी घोषणा केली आणि सांगितले की, 5 ऑगस्ट […]
केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे जीएसटी परिषदेच्या शिफारशी स्वीकारण्यास बांधील नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचे फक्त एक प्रेरक मूल्य (Persuasive Value)आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील […]
समलिंगी विवाह प्रकरण राष्ट्रीय महत्वाचा मुद्दा नाही, केंद्र सरकारचा लाइव्ह-स्ट्रीमिंगला विरोध
नवी दिल्ली : समलिंगी विवाहांना मान्यता मिळावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयासमोरील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने विरोध केला आहे. सरकारने असा युक्तिवाद केला आहे की ही बाब राष्ट्रीय महत्त्वाची नाही आणि बहुसंख्य भारतीय लोकसंख्येवर त्याचा परिणाम होत नाही. थेट प्रक्षेपण शोधण्याचा अर्जदाराचा उद्देश अविश्वासू आहे कारण तो “अनावश्यक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत […]
पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार, केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने सर्वांना हैराण केले आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखड्याचा सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रसार करण्याचे आवाहन केले. […]










