नागपूर : इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी राज्यात 65 नवी वसतिगृहे सुरू करण्याचे काम इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पूर्ण केले असून या उपक्रमाचे श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. दहा–बारा वर्षे अडकलेला प्रश्न मार्गी […]
टॅग: सिंधुदुर्ग
राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; ११ जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुणे : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाली असून काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) महाराष्ट्रात […]
शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचवा – राज्यमंत्री योगेश कदम
सिंधुदुर्ग : शासनाने नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. गावपातळीवर योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून गतीमान अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. राज्यमंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत संबंधित विभागांच्या […]
कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी वाहतूकीस मान्यता
मुंबई : मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी जलवाहतूक प्रथमच सुरू होत असून हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. माझगाव भाऊचा धक्का येथे एम टू एम प्रिन्सेस या रो-रो कंपनीची […]
वेंगुर्ला तालुक्यातील कॅम्प गवळीवाडा येथील अतिक्रमण नियमित करण्यास मान्यता
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे वेंगुर्ला येथील कॅम्प गवळीवाडा येथील चार ते पाच पिढ्यांपासून वास्तव्य करत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. कॅम्प गवळीवाडा येथील स.न.४९१, हि.नं. १अ/१ मधील शासकीय जमिनीवर धार्मिक स्थळाचे […]
सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]
तारकर्ली समुद्र किनारी दुर्दैवी घटना, ५ पर्यटक बुडाले; वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांच्या मदतीने तिघांचा जीव वाचला
सिंधुदुर्ग: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाच पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी गेले होते, त्यात पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते बुडाले. या घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, तीन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पुणे येथील हे पर्यटक तारकर्ली समुद्रकिनारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले होते. पोहण्याच्या […]
पुढील 2 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहणार
पुणे : पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील २-३ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणानुसार, रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग, नवी मुंबई, रत्नागिरी, पुणे […]
राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता
मुंबई : राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील आठवड्यात 25 ते […]
पुढील 3-4 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, बाहेर पडताना खबरदारी घेण्याचा इशारा
मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 3-4 तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत आयसोल ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. बाहेर पडताना खबरदारी घ्यावी असा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत विजांच्या […]









