मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सलग सातव्या दिवशी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु असून दिल्लीत शेतकरी मोदीसरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. हरयाणा आणि पंजाबमधील शेतकरी या कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. मंगळवारी सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पीयूष गोयल आणि सोम प्रकाश यांनी शेतकरी नेत्यांशी बैठकीत संवाद साधला. पण […]
टॅग: शेतकरी
कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी संपू लागल्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी
शेतकर्यांना नवीन मार्ग मिळाला आहे. बऱ्याच विचारविनिमयानंतर भारताच्या संसदेने कृषी कायद्यांना ठोस आकार दिला. या सुधारणांमुळे शेतकरी बंधनमुक्त होणार असून, नवीन हक्क, नवीन संधीही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानांनी यावेळी कृषी कायद्याला होत असलेला विरोध आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. […]
केंद्र सरकारने कुसुम योजनेचा केला विस्तार, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला
केंद्र सरकारने कुसुम योजनेचा आणखी विस्तार केला असून आता त्यातून 30,800 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या योजनेसाठी सरकारला 34,035 कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत पुढील दोन आर्थिक वर्षांत एकूण 35 लाख शेतकर्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप चालवण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या योजनेमुळे देशाला डिझेल चालवणाऱ्या सिंचन पंपांपासून मुक्ती मिळेल, तसेच […]
चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे कांद्याबाबत पत्राद्वारे केली ही मागणी
मुंबई: शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवणीची मर्यादा सध्याच्या २५ टनावरून वाढवून १०० टन करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे बुधवारी पत्राद्वारे केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारने कांद्याचा साठा करण्यावर निर्बंध लागू केले आहेत […]
अतिवृष्टी भागात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तीन दिवस दौरा
मुंबई : महाराष्ट्रात पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. १९ ऑक्टोबर पासून दौऱ्याला सुरुवात होईल. आपल्या दौऱ्याची सुरुवात देवेंद्र […]
शेतकरी पुत्राने मागितली राज्यापालांना भेटण्यासाठी वेळ..
सोलापूर : प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र अचानकपणे कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने देशभरातील कांद्याचे भाव कमी होणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे […]






