मुंबई : हवामान विभागाकडून पुणे, सातारा आणि रत्नागिरीत आज (17 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]
टॅग: रत्नागिरी
हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी, आज अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाला असून आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान खात्याने राज्यात ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा व घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्र ऑरेंज […]
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन, सर्व प्रकारची दुकाने राहणार बंद
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊन आजपासून (3 जून) 9 जूनपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापने बंद राहणार आहेत. केवळ 11 वाजेपर्यंत घरपोच दुधाचा पर्याय देण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून जिल्हा प्रवेशासाठी ई पास अनिवार्य करण्यात […]
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, पुढील ३ तास महत्त्वाचे
मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट […]
Cyclone Tauktae : ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला सतर्कतेचा इशारा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील भागात सतर्कता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या […]
लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे एमआयडीसीत पुन्हा एका कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरल्याचे माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. स्फोट […]
रत्नागिरीत बस दरीत कोसळून भीषण अपघात, बसमध्ये 27 प्रवासी
रत्नागिरी : कशेडी घाटात खाजगी बस 50 फुट दरीत कोसळून आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे. बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घाटात 50 फुट खोल दरीत कोसळली. या […]







