मुंबई : हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 33 वर्षांचा होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या गोलंदाजीच्या खास शैलीसाठी अश्विन यादव ओळखला जायचा. त्याच्या पश्चात पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत.
भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी अश्विनच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विट करत म्हटलं कि, “अश्विन यादवच्या जाण्याने मी खूप दुखी झालो आहे, मला मोठा धक्का बसला आहे, एक हसतमुख खेळाडू आपल्यातून निघून गेला. तो ‘टीम मॅन’ होता. मी देवाकडे प्रार्थना करतो ती ईश्वराने हा आघात सहन करण्याची ताकद त्याच्या कुटुंबाला द्यावी. क्रिकेटमध्ये नक्कीच अश्विनची कमी भासेल. ओम शांती”
Devastated to hear the news of #Ashwinyadav passing away. A Very jovial and fun loving guy, team man to the core, punched way above his skills as a fast bowler. I pray to God for strength to his family. #gonetooearly #OmShanti
You will be missed. pic.twitter.com/0gIuOKZr6L— R SRIDHAR (@coach_rsridhar) April 24, 2021
अश्विन यादवने 2007 मध्ये पंजाबविरुद्ध मोहालीमध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करणारा यादवने 14 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यामध्ये त्याने 34 बळी घेतले. 2008-09 च्या हंगामात त्याने उप्पल स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करत 52 धावा देऊन 06 बळी घेतले. अश्विनने शेवटचा रणजी सामना 2009 मध्ये मुंबई विरुद्ध खेळला. मात्र स्थानिक लीगमध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद व त्यानंतर एसबीआयकडून खेळणे त्याने सुरुच ठेवले. तो हैदराबादकडून 10 सामने आणि 2 टी-20 सामने खेळला होता.




