मुंबई : यंदा मान्सून वेळेवर आला आणि पाऊसही चांगला पडला. पण आता मान्सून वेळेवर न परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यामुळे, यावेळी मान्सून परतण्यास उशीर होणार आहे. हा कालावधी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्याहूनही पुढे जाऊ शकतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते.
साधारणतः सप्टेंबरच्या मध्यात भात, कापूस, सोयाबीन, मका आणि कडधान्यांची कापणी होते. परंतु यंदा पाऊस असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांना कापणी-काढणी करणे कठीण होईल. मात्र, हिवाळ्यात पेरलेल्या गहू, हरभरा या पिकांना या वातावरणाचा फायदा होऊ शकतो, कारण माती ओलसर राहील.
भारतातील वार्षिक पाण्याच्या गरजेपैकी 70 टक्के पाणी मान्सून आणतो. त्यामुळे शेती सुधारते. जलाशय भरतात. निम्म्याहून अधिक शेती पावसाळ्यावर अवलंबून आहे. मात्र, यावर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत असल्यामुळे मान्सून परतीस विलंब होईल. यावेळी मान्सून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.




