जम्मू – काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील भारतीय सीमा रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने ठार मारले आहे. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर ऍक्शन टीममधील दहशतवाद्यांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने ४-५ फेब्रुवारीच्या रात्री नियंत्रण रेषेवरील त्यांच्या चौकीवरील पाकिस्तानी घुसखोरांचा हल्ला उधळून लावला. या दरम्यान, ७ पाकिस्तानी घुसखोरांना ठार करण्यात आले. या घुसखोरांमध्ये २ ते ३ पाकिस्तानी लष्करी सैनिकांचाही समावेश होता. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा व्हॅली सेक्टरमध्ये ही घटना घडली.