अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच भारतीय नागरिकांना चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या स्वाधीन केले. ते सर्व १२ दिवसांनी भारतात परतले. चीनच्या हद्दीत त्यांचे हस्तांतरण करण्यात आले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.
आता त्यांना कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाईल. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी सांगितले की, हे पाचही तरुण भारतात परततील. त्यांनी ट्विट केले होते की, तरुणांना चीनमधून सोडण्याचे मान्य केले गेले आहे.
अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती




