महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत आत्मविश्वास वाढत आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच लशीसाठी सामान्यांना फार वाट पाहावी लागणार नाही, सामान्य नागरिकांसाठी चार ते पाच महिन्यांत लस उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सामान्य नागरिकांसाठीच्या कोरोना लसीकरण मोहिमेवेळी लशीची कमतरता भासणार नाही. सरकार योग्य पाठपुरावा करत राहील, असे सांगून टोपे यांनी आश्वस्थ केलं. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नावे नोंदवून घ्यावी, असे निर्देशही यावेळी टोपे यांनी दिले.




