मुंबई : राज्यात निवडणूक आयोगामार्फत पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. मात्र, राज्यातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा असे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशांनंतर आता राज्याचे मुख्य सचिव जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.




