मुंबई : अभिनेता सलमान खानला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगून न्यायालयाने सलमान खानविरुद्ध २०१९ साली केलेली तक्रार फेटाळून लावली आहे.
पत्रकाराने केला होता मारहाणीचा आरोप
2019 मध्ये अशोक पांडे नावाच्या पत्रकाराने आरोप केला होता की, सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि शिवीगाळ केली. पत्रकाराने सर्वप्रथम अंधेरीतील दंडाधिकार्यांकडे तक्रार केली hoti.
पत्रकाराच्या वकिलाने तक्रार दाखल करताना सांगितले होते की, अशोक पांडे 2019 मध्ये सलमानसोबत फोटो काढत असताना अभिनेत्याच्या अंगरक्षकांनी त्याचा फोन हिसकावून मारहाण केली. सलमानने आपल्याला धमक्याही दिल्याचा आरोपही त्याने केला आहे. मात्र, आज हायकोर्टाने सर्व आरोप निराधार ठरवत सलमानला क्लीन चिट दिली आहे.




