महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती, 3500 पोलिस तैनात, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या चकमकींदरम्यान शहरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 3500 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. घटनेबाबत सोशल मीडियावर कोणीतीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास प्रशासनाच्या वतीने गंंभीर दखल घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आस्तीक कुमार पांडेय म्हणाले, दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आहे. आता शहरात पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली आहे. मी शहरवासियांनी आवाहन करतो की आता येणाऱ्या सर्व सणांमध्ये, महावीर जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, ईदचा पवित्र महिना आहे. हे सगळे सण शांततेने आणि आनंदाने साजरे करा. जे समाजकंटक आहेत त्यांच्यासाठी इशारा आहे, जो कोणी बेकायदेशीर काम करत आहे त्यांच्यावर प्रशासनाचे लक्ष आहे.

सध्या शहरात 3 हजार 500 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले. किराडपुरा परिसरात झालेल्या दंगलीनंतर पालकमंत्री संदिपान भुमरे आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी राम मंदिराला भेट देत घटनास्थळाची पहाणी केली. घटनेचा पोलिसांकडून आढावा घेतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत