मुंबई : दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करणाऱ्या गँगचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मुंबईत काहीजण गांजा पोहोचवत असल्याची माहिती मिळाली होती. घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एक ट्रक अडवली.
अडवलेल्या ट्रकमध्ये नारळ भरलेले होते. आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवली होती, त्यात त्यांनी 1800 किलो गांजा लपवला होता. या जप्त केलेल्या गांजाची किंमत जवळपास साडे तीन कोटी रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी ट्रकमध्ये असलेल्या आकाश यादव आणि दिनेश सरोज या दोघांना अटक केली आहे. आकाश यादवविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत.
ओडिशातून आंध्रप्रदेशमार्गे हा गांजा मुंबईत आणला जाऊन गोदामात साठवला जाणार होता. तिथून तो मुंबईतील वेगवेगळ्या भागात डिस्ट्रिब्युट करण्यात येणार होता.




