मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून तातडीने ध्वनिक्षेपक काढण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक अध्यक्षांनी केली आहे.
मनसे नाशिक अध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना मशिदींतील लाऊडस्पीकर लवकरात लवकर हटवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 12 एप्रिल रोजी ठाण्यातील सभेत राज्य सरकारला 3 मे पर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्यास सांगितले होते. जर लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर पक्षाचे कार्यकर्ते मशिदींसमोर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात करतील, असेही ते म्हणाले होते.
तत्पूर्वी, बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील संगमनेर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही दंगलखोरांनी गोंधळ घातला आणि इस्लाम झिंदाबाद आणि अल्लाह-हू-अकबरच्या प्रक्षोभक घोषणा दिल्या. यावेळी जमावाकडून महिलांचा विनयभंग झाल्याचीही चर्चा आहे.




