राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. मेट्रोच्या प्रश्नावर अतिशय अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि, मेट्रो-३ च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड उभारण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दिशाभूल केली जात असल्याचं देखील ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र..#MumbaiMetro pic.twitter.com/CygnVSq3XJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2021