Uday Samant
महाराष्ट्र

पर्यावरण नियमांचे उल्लंघन असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल कंपनीवर कारवाई करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एम‌.आय.डी.सी. परिसरातील धारिवाल कंपनीने केलेल्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरण विभागाच्या अटी व शर्तीचे पालन केले आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल. या कंपनीकडून पर्यावरण नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सदस्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल पॉवर प्लांटच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री सामंत म्हणाले की, एम‌.आय.डी.सी.चे सहसचिवांच्यामार्फत 90 दिवसांच्या आत चौकशी केली जाईल. यात ही कंपनी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत