मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एम.आय.डी.सी. परिसरातील धारिवाल कंपनीने केलेल्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरण विभागाच्या अटी व शर्तीचे पालन केले आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल. या कंपनीकडून पर्यावरण नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल पॉवर प्लांटच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री सामंत म्हणाले की, एम.आय.डी.सी.चे सहसचिवांच्यामार्फत 90 दिवसांच्या आत चौकशी केली जाईल. यात ही कंपनी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.




