मुंबई : राज्यात कोविड-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड-19 टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. वाढत्या रुग्णांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी ६ वाजता कोविड टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे.
बुधवारी महाराष्ट्रात 1,081 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदवली गेली, जी 24 फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक दररोजची वाढ आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. मंगळवारी, राज्यात 711 प्रकरणे आणि एक कोविड-19 मृत्यूची नोंद झाली. 24 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात 1,124 संसर्गाची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी मुंबईत 739 नवीन प्रकरणे नोंदली गेली, ज्यात धारावी झोपडपट्टी वसाहतीमधील दहा रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू दर 1.87 टक्के आहे आणि राज्यातील केस बरे होण्याचे प्रमाण आता 98.07 टक्के आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. मुंबई शहरात रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आले आहे.
आकडेवारी :
- महाराष्ट्रातील सक्रिय प्रकरणांची संख्या आता 4,032 आहे.
- नंदुरबार, धुळे, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा आणि गोंदियामध्ये शून्य सक्रिय रुग्ण आहेत.
- 24 तासांच्या कालावधीत कोविड-19 संसर्गातून 524 रुग्ण बरे झाले असून, महाराष्ट्रात बरे झालेल्यांची संख्या 77,36,275 झाली आहे.
- गेल्या 24 तासात 25,416 चाचण्या घेण्यात आल्याने, महाराष्ट्रात आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची संख्या 8,09,51,360 वर पोहोचली आहे.
- मुंबई विभागात ९६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
- नाशिक विभागात ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
- पुणे विभागात ८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
- कोल्हापूर विभागात आज ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
- औरंगाबाद विभागात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
- लातूर विभागात १ रुग्णाची नोंद झाली आहे.
- अकोला विभागात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
- नागपूर विभागात १५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.




