यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे 5 मुलं अंगावार वीज पडून गंभीर जखमी झाली. अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे भिजण्यापासून वाचण्यासाठी ही मुलं झाडाखाली थांबली होती. परंतु, दुर्दैवाने ते ज्या झाडाखाली थांबले होते, तिथेच वीज पडल्यामुळे ही मुलं गंभीर जखमी झाली. या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे ही मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. भिजण्यापासून वाचण्यासाठी ही पाचही मुलं एका झाडाखाली उभी राहिली. मात्र, यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत पाचही मुलं गंभीर जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच, जखमी मुलांच्या कुटुंबियांनी मुलांकडे जाऊन तात्काळ मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.




