मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे गुरुवारी, १७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर त्यांना गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कोट्टायम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मूळ कोट्टायममधील कुमारनेल्लूर येथील रहिवासी असलेल्या प्रदीप यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये काम केले होते, मुख्यत: कॉमिक सहाय्यक भूमिका त्यांनी केल्या.
प्रदीप यांचा पहिला चित्रपट होता ई नाडू इनले वारे, ज्याचे दिग्दर्शन आयव्ही ससी यांनी केले होते. त्यांना गौतम मेननच्या विनयथंडी वरुवया या चित्रपटात यश मिळाले. त्यानंतर विनीत श्रीनिवासनच्या थट्टाथिन मरायथमध्ये त्यांच्या सहाय्यक भूमिकेचेही कौतुक झाले. यानंतर, ते अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये दिसले. आमेन, वडक्कन सेल्फी, सेव्हन्थ डे, पेरुचाझी, एननम एपोझुम, लाइफ ऑफ जोसुट्टी, आडू, कट्टापनायले हृतिक रोशन हे त्याचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.
त्यांच्या अनोख्या डायलॉग डिलिव्हरीच्या शैलीसाठी त्यांची सर्वत्र प्रशंसा झाली. त्यांनी राजा रानी आणि नानपनाडा यासह अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. 2020 मध्ये प्रदर्शित झालेला पापम चेयथावर कलेरियात्ते हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. गेली ५० वर्षे ते रंगभूमीवर सक्रिय होते. ते भारतीय आयुर्विमा महामंडळातही कर्मचारी होते. कोट्टायम प्रदीप यांच्या पश्चात पत्नी माया, दोन मुले, विष्णू आणि वृंदा असा परिवार आहे.




