मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या (मंगळवार) मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपसमितीची बैठक होईल. या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. तसेच शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत जिल्ह्यातील पालकमंत्री आणि पालकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल.




