औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीची कॉलेजजवळून ओढून नेत हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार देवगिरी महाविद्यालयाजवळ आज दुपारी घडली. आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलिसांची 3 पथके असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग असे मृत विद्यार्थींनीचे नाव असून ती १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. कॉलेजजवळून ओढत नेत तिची हत्या करण्यात आली आहे. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे. आरोपीने तरुणीला ओढत नेत तिची हत्या केली. भर दिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
मिळलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी आणि मारेकरी दोघेही उस्मानपुऱ्यातील आहेत. ते एकमेकांच्या ओळखीचेही होते. ते एका कॅफेत बसले होते, तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे कॅफेचालकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, तेथून निघाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यानंतर मारेकऱ्याने त्याच्याजवळील शस्त्र काढले तेव्हा जीवाच्या आकांताने तरुणी पळु लागली. ती ओरडत असल्याने इतर लोकही मागे पळत होते. मात्र, आरोपीने विद्यार्थिनीला 200 फूट ओढत नेले, त्यानंतर तिचा गळा कापला, यातच तिचा मृत्यू झाला.