जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन
माजी सपा नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून वेगळे झाल्यानंतर […]
कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. सुशांत सिंह राजपूत […]
कोरोना प्रसार वाढण्यास केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार- जयंत पाटील
देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारने पहिला लॉकडाऊन लागू करताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही. पहिला लॉकडाऊन लागू करण्याआधी […]
सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्रीच- अशोक चव्हाण
सध्या राज्यात तीन पक्षांच सरकार असलं तरी राज्य सरकारचं स्टेअरिंग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचं सार्वजनिक बांधाकम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास सरकार पुढील पाच वर्षे टिकेल असा विश्वास देखील चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केला. अशोक चव्हाण म्हणाले, सरकार […]
आरे संदर्भातील प्रश्न महाराष्ट्र सरकारचा- प्रकाश जावडेकर
आरे संदर्भातील प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. आरे संदर्भातील विषय केंद्राकडे आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकाश जावडेकर म्हणाले, सर्व शहरात इलेक्ट्रीक बस आणणे आणि शहरातील हवा शुद्ध ठेवणे हा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणाचा समतोल आणि विकास हे आमचे […]
आपलं राज्य सर्व गोष्टींनी सुसज्ज असायला हवं- छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शौर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. परंतु, आपण जर परदेशात गेलो तर तिथल्या गोष्टी पाहून असं वाटतं की, आपण किती मागे आहोत. इतिहासाबाबत सर्वांना प्रेम पाहिजे, त्यासंदर्भात सगळी माहिती पाहिजे, इतिहास […]
राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळालं -नितीन गडकरी
राज्यात भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, राजकारणात कोण कुणासोबत जातं त्यावरुन मी माझी निष्ठा बदलणार नाही. राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळायला.. त्यामुळे शिवसेनेने कुणाशी युती केली, कुणासोबत युती नाही केली, याच्याशी आमचा काही संबंध नाही. बाळासाहेबांचं स्थान कालही, आजही […]
सामना संपादकीयमधून नव्या शैक्षणिक धोरणांवर दीर्घ भाष्य
दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने शैक्षणिक धोरणांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आजच्या सामना संपादकीयमधून या नव्या शैक्षणिक धोरणांवर दीर्घ भाष्य करत मोदी सरकारला टोला लगावण्यात आला आहे. त्यातील मुद्दे असे : पंतप्रधान मोदी यांनी एक काम नेक केले. देशाचे शैक्षणिक धोरण संपूर्ण बदलले. हा बदल 34 वर्षांनी झाला. फ्रान्सवरून आलेल्या राफेल विमानांपेक्षा हे महत्त्वाचे आहे. […]
लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही- मनसे प्रमुख राज ठाकरे
२३ मार्चपासून देशात लॉकडाउन आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाउन आणि अनलॉकवर टीका केली. सुरूवातीच्या काळात कोणाला करोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. आज आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थिती समजते. परंतु आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असं परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. आपल्याकडे पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक […]










