Rahul Narwekar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून आज तिसरा व शेवटचा दिवस आहे. मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतली आहे. आजच्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात येणार आहे. त्यांनी कालच या पदासाठी अर्ज दाखल केला होता, आणि त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू करण्यात […]

Shinde's MLA Took the Oath, But Couldn’t Read a Single Word; What Exactly Happened?
महाराष्ट्र राजकारण

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ, पण एकही शब्द वाचता आलं नाही; नेमकं काय घडलं?

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी, विशेष अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नव्या आमदारांनी आपली आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १०६ नव्या आमदारांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक सदस्य […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजनांची माहिती, समन्वयाचा अभाव पण महायुतीत मतभेद नाही…

मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी गेले असताना त्यांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते ठाण्यात आपल्या निवासस्थानी पोहोचले. पण, अद्यापही शिंदेंना विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सत्तास्थापनेत […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करायला हवे होते, शिवसेनेच्या उबाठा गटाची काँग्रेसवर टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकासआघाडीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना आता शिवसेनेच्या उबाठा गटाने पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, त्यांच्या ‘अतिआत्मविश्वासामुळे’ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कामगिरीला धक्का बसला आहे. मुंबईत […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

एक दिवस ठाकरे कुटुंबासह देश सोडतील, शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

शिर्डी : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो, एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील. माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. ज्यांनी बाळासाहेबांशी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलं, त्या […]

महाराष्ट्र राजकारण

बाळासाहेब थोरातांचा पराभव, अमोल खताळ ठरले जायंट किलर

अहिल्यानगर : संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला आहे. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं असून त्याचा निकाल आज २३ नोव्हेंबर रोजी लागत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार झाली. सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतली होती. ती आघाडी कायम ठेवत आता भाजपने तब्बल महायुतीने […]

महाराष्ट्र राजकारण

‘हा जनतेचा निर्णय नाही’, निवडणुकीच्या निकालांवर संजय राऊतांचा आक्षेप

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, आपण जो निकाल पाहतोय त्यावरून काहीतरी गडबड असल्याचे दिसत आहे. हा जनतेचा निर्णय नाही. इथे काय चूक आहे ते प्रत्येकाला समजेल. महायुतीने असं काय केलं की, त्यांना १२० पेक्षा जास्त जागा मिळत आहेत? महाराष्ट्रात महविकास आघाडीला ७५ जागाही मिळत नाही […]

demanding measures on traffic congestion garbage safety of citizens and other issues
पुणे महाराष्ट्र राजकारण

खासदार सुप्रिया सुळे यांचे पालकमंत्री अजित पवारांना पत्र, वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी

पुणे : जागतिक दर्जाचे ‘आयटी हब’ अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुविधा गतीने पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी संबंधीत सर्व शासकीय आस्थापनांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी […]

Approval of Nalganga River Linking Project
महाराष्ट्र राजकारण

महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार

बुलढाणा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा […]

Cabinet decision
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मंत्रिमंडळ निर्णय – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार, प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करण्याच्या धोरणास मान्यता

महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार […]