ठाणे : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. त्यामुळे […]
ठाणे
महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावे, दादाजी भुसे यांनी केली पाहणी
ठाणे : वडपे-ठाणे महामार्गावरील कामांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी पाहणी केली. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, रहदारी सुरळीत राहिल, यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात. तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच जिल्हा व ठाणे शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीसाठी तातडीने वॉर्डन नेमण्याच्या सूचना […]
पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. […]
मोडक महाराज यांचे भीषण अपघातात निधन, कारच्या काचेतून बाहेर फेकले गेल्याने जागीच मृत्यू
ठाणे : नवनीत्यानंद (मोडक महाराज) यांचे पुणे बंगळूरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात निधन झाले. कारच्या समोरील काच फुटून मोडक महाराज हे बाहेर फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्री. नवनित्यानंद मोडक महाराज उर्फ अरुण सिताराम मोडक (वय ५४) रा. कल्याण पश्चिम येथील सदगुरु श्री. स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
ठाणे : भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना नेत्या वंदना डोंगरे यांनी तक्रार दाखल केली आहे. गांधी यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आली. आयपीसी कलम 500, 501 अंतर्गत नॉन-कॉग्निझेबल (एनसीआर) […]
अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमएमआरडीएच्या वतीने मुंब्रामधील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन […]
अमेय खोपकर यांची जीभ घसरली, राष्ट्रवादीवाले xxची औलाद, यांना लाजा नाही वाटतं?
ठाणे : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरलीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना अपशब्द वापरल्याची बातमी समोर आलीय. खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत”, अशा अर्वाच्य भाषेत अमेय खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलीय. माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर […]
ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
ठाणे : गीता ग्रंथातील ज्ञान विश्वातील मानवता निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हे सरकार भगवद् गीतेच्या ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथील आनंदनगरमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व विराट संत संमेलनास […]
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात 79 पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर सदर आपत्ती प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेस ही मान्यता दिली. ठाणे महानगरपालिकेने या संदर्भात आपत्ती प्रतिसाद पथकात वर्ग-२ व वर्ग-३ मध्ये ७९ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला […]
ठाण्यात खळबळ! घरगुती वादातून स्वतःची पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले, आग लागल्याचा केला बनाव, मात्र…
ठाणे : डोंबिवली येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपीही होरपळला गेला. दरम्यान, घटनेनंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आरोपीची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मिळालेल्या […]










