दिल्ली : रेमडेसिवीरसोबतच ऑक्सिजनचा होणारा तुटवडा अनेक राज्यांसाठी चितेंची बाब ठरली आहे. राजधानी दिल्लीत ५०० कोरोना रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. वेळ हातातून निघून चालली असतानाच ऑक्सिजनचा टँकर पोहोचला आणि सर्वांना दिलासा मिळाला.
आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला असल्याचं सांगितल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन टँकर रुग्णालयात पोहोचला. रुग्णालयात गंभीर प्रकृती असणाऱ्या ५०० कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात रात्री २ वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आम्ही सर्वांनीच आशा सोडली होती. वेळ निघून चालली होती. रुग्णालयात दाखल ५०० रुग्णांना या परिस्थितीची माहिती द्यावी असंही आम्हाला वाटत नव्हतं. काहीतरी चमत्कार व्हावा यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो. ऑक्सिजन टँकर आल्याचं पाहून आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
Acute shortage of oxygen at GTB Hospital. Oxygen may not last beyond 4 hrs. More than 500 corona patients on oxygen. Pl help@PiyushGoyal
to restore oxygen supply to avert major crisis. pic.twitter.com/QNMSoWgNTA— Satyendar Jain (@SatyendarJain) April 20, 2021
सत्येंद्र जैन यांनी ट्विट करत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी ट्विटमध्ये काही स्क्रीनशॉटही जोडले होते.




