नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या. येथे त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. झालं असं कि, ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी व्यासपीठावर आल्या आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी कोणाचा अपमान करणे योग्य नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी स्टेजवर पोहोचताच जयश्री राम अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या. यामुळे चिडलेल्या ममता बॅनर्जी यांनी मंचावर बोलण्यास नकार दिला. एकीकडे जयश्री राम आणि दुसरीकडे भारत माता की जय ह्या घोषणा दिल्या जात होत्या. यावर ममता बॅनर्जी नाराज झाल्या आणि म्हणाल्या कि, “जर आपण एखाद्याला आमंत्रित केले असेल तर अशा प्रकारे त्याचा अपमान केला जाऊ शकत नाही. मी आता काहीच बोलणार नाही. जय हिंद, जय बांग्ला”




