मुंबई : येत्या ३-४ तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा येथील घाट परिसर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे या भागात संपूर्ण काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. या कालावधीत शक्य असल्यास घाट परिसरात फिरणे टाळा, सुरक्षितपणे वाहन चालवा आणि सावध रहा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
?Next 2,3 days there could be very intense rainfall in ghat areas of Maharashtra,owing Weather conditions forecasted.
So requesting all to take full care & safety measures in these areas pl.
If possible avoid outings in these areas during the period.
Drive safely & Be Watchful. pic.twitter.com/zJt27n7z3m— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 11, 2022




