मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत नवी राजकीय भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक जून महिन्यात होणार आहे. या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे २, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होईल. सहाव्या जागेवर मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा एक प्रतिनिधी निवडून येण्यास अडचण नाही. संभाजीराजेंना उरलेली मत देण्यात येतील, असं म्हटलं आहे. आज रायगड जिल्ह्यातील उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.
राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशभरातील ५७ जागांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ६ जागांचा त्यामध्ये समावेश आहे. शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पीयूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे ,राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी.चिदंबरम यांचा कार्यकाळ संपल्यानं ६ जागांवर निवडणूक होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करत राज्य सरकार आणि भाजपकडे पाठिंबा मागितला आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक




