मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव व औरंगाबाद या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना होणार फायदा




