नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2021 हे वर्ष चांगले जात आहे. कारण मोदी सरकारने त्यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सरकारने त्यांचे भत्ते आणि इतर भत्ते कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्वतः याची घोषणा केली. खरं तर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये कपात करण्याबाबत भीती होती. राज्यसभेच्या एका सदस्याने याबाबत अर्थ राज्यमंत्र्यांना प्रश्न विचारला.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक सरकारी विभागांमध्ये वर्क फ्रॉम होम (WFH) स्वीकारण्यात आले होते. म्हणजेच, कर्मचारी घरून काम करत होते. तेव्हा त्यांना वाटले की सरकार त्या काळात परिवहन भत्ता (टीए) कापू शकते. याबाबत पंकज चौधरी यांच्यासमोर प्रश्न आला तेव्हा ते म्हणाले की, सरकार असे काही करण्याचा विचार करत नाही. याचा अर्थ WFH दरम्यानचा TA सरकारी कर्मचाऱ्यांकडून काढून घेतला जाणार नाही.




