Five days of water cut in Mumbai from tomorrow to Friday
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत उद्यापासून शुक्रवारपर्यंत पाच दिवस पाणीकपात

मुंबई : मुंबईत उद्यापासून (१७ मे) शुक्रवार (२१ मे) पर्यंत सलग पाच दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची तातडीने दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास सोसावा लागणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. पिसे बंधाऱ्यातून पाणी शुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. हे पिण्यायोग्य केलेले पाणी मुंबईला पुरवले जाते. या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. दुरुस्तीच्या कामाची ऑर्डर निघाली आहे.

मुंबई मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे की पाण्याचा आवश्यक तेवढा साठा करावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, तसेच प्रशासनास सहकार्य करावे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत