मुंबई : मुंबईत उद्यापासून (१७ मे) शुक्रवार (२१ मे) पर्यंत सलग पाच दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची तातडीने दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास सोसावा लागणार आहे. भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. पिसे बंधाऱ्यातून पाणी शुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. […]

