मुंबई : राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका जोरात सुरू असताना, आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये म्हाडा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प, कौशल्य विद्यापीठासाठी पदांची निर्मिती आणि विविध कायद्यांमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयांचे मुख्य मुद्दे: 1. नगर विकास विभाग राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणांच्या जमिनींचा सुयोग्य वापर सुनिश्चित करणे. संकल्पना आधारित आयकॉनिक […]
टॅग: महाराष्ट्र बातम्या
नवले ब्रिज अपघात प्रकरण : कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याचे ठोस पुरावे नाहीत, आरटीओचा प्राथमिक अहवाल
पुणे : नवले पुल परिसरात झालेल्या कंटेनर ट्रक अपघाताबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले आहेत. आरटीओच्या मते, हा अपघात वाहन चालकाने कंटेनरवरील नियंत्रण गमावल्यानंतर झाल्याची शक्यता अधिक असून, ब्रेक फेल झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. पुणे आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडने गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस तपासणी केली. या तपासात असे आढळले की अपघातानंतर […]
आता मी कंटाळलो…! व्यथित इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय
अहिल्यानगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र यावरुन सोशल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज फारच व्यथित झाले आहेत. परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदोरीकर महाराज म्हणाले – आमची […]
हिंगोलीतील सुकळी साठवण तलावासाठी १२४ कोटींचा निधी
मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील सुकळी साठवण तलाव प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यास देखील मान्यता देण्यात आली. सुकळी साठवण तलाव लघु प्रकल्प आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारित सुकळी गावाजवळील नाल्यावर ४.०७ द.ल.घ.मी. क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात येणार […]
नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल, ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य
मुंबई : नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी, नागपूर जिल्हा बँकेला ८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती […]
पुण्यात १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या, तीन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी संध्याकाळी १७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप गार्डनजवळ घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. खडक पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मृत तरुण हा आपल्या मित्रासोबत […]
सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट! पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसह केली पतीची निर्घृण हत्या, आणि…
रायगड : रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी केवळ २४ तासांत गुन्ह्याची उकल केली आहे. मृत व्यक्तीचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, पाबळ, पेण) असे आहे. त्याचा […]
उच्च न्यायालयासाठी २ हजार २२८ पदांची निर्मिती
मुंबई : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. न्यायालयीन कामकाज गतीने होण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याचबरोबर न्यायालयीन कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्तेचा जास्तीत जास्त वापर करुन कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टीने २ हजार २२८ पदे निर्माण […]
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
जेवणात चिकन मागितल्याने राग अनावर, आईने बेदम मारहाण केल्याने चिमुकल्याचा मृत्यू
पालघर : पालघरमधील घोडीला कॉम्प्लेक्स परिसरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जेवणात चिकन हवे अशी मागणी केल्यामुळे रागाच्या भरात आईने आपल्या सात वर्षांच्या मुलाला लाटण्याने बेदम मारहाण केली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पतीपासून वेगळी राहत होती. ती आपली दोन मुले आणि दोन बहिणींसोबत घोडीला […]







