पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती मगर चौधरी (वय अंदाजे 30) यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात पती रोहन चौधरी, सासू सुनिता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल […]
टॅग: marathi news
निष्काळजीपणाचा कळस! विक्रोळीत स्पीकर अंगावर कोसळून 3 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली असून निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी विक्रोळी पूर्वेकडील टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात घडली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी रस्त्याच्या कडेला मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. घटनेच्या वेळी तीन वर्षांची मुलगी खेळत असताना, अचानक तो स्पीकर तिच्या […]
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल होत असून नागरिकांना थंडी, पाऊस आणि वाढत्या तापमानाचा एकाच वेळी सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जाणवणारी तीव्र थंडी आता हळूहळू ओसरत असून, त्याचबरोबर अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागांवर होणार आहे. […]
निष्काळजीपणाचा कहर! दौंडमध्ये रोड रोलरखाली चिरडून 4 वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत मुलाचे नाव आर्यन जाधव असे असून ही घटना दौंड शहरातील […]
हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
मुंबई : हिवाळ्याचे दिवस सुरू होताच तापमानात अचानक घट होते आणि त्यामुळे सर्दी, खोकला, त्वचा कोरडी पडणे, सांधेदुखी अशा तक्रारी वाढतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या हंगामात योग्य आहार, योग्य कपडे आणि स्वच्छ जीवनशैली अवलंबल्यास अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो. 1. कोमट पाणी नियमित प्या हिवाळ्यात तहान कमी लागते, परंतु शरीरातील द्रवपातळी टिकवण्यासाठी कोमट पाणी […]
हिंजवडी आयटी पार्क हादरलं: भरधाव बस फुटपाथवर; बहीण–भावाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा बेफाम वेगाचा कहर पाहायला मिळाला. गर्दीच्या वेळी कंपनीची बस अचानक फुटपाथवर चढत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर वाहतूक आणि रस्ते सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या अपघातांच्या मालिकेत सोमवारी आणखी एक भीषण घटना घडली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंचरत्न चौकाजवळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणारी […]
अनैतिक संबंधातून पत्नी आणि भावाने केला तरुणाचा खून, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…
जालना : एका पत्नीने दिरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सुमारे एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय परमेश्वर तायडे यांच्या मृत्यूचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी परमेश्वर तायडे यांचा भाऊ ध्यानेश्वर तायडे (28) आणि पत्नी मनीषा तायडे (25) आणि यांना अटक करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामधील सोमठाणा गावात हे […]
आता मी कंटाळलो…! व्यथित इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय
अहिल्यानगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र यावरुन सोशल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज फारच व्यथित झाले आहेत. परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदोरीकर महाराज म्हणाले – आमची […]
‘गौतमी पाटीलच्या वक्तव्यांमध्ये कमालीची विसंगती’, रिक्षाचालक मरगळे यांच्या मुलीने घेतला चांगलाच समाचार
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातानंतर आता या प्रकरणात नवा वाद उफाळला आहे. या अपघातात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आयसीयूतून बाहेर आले असून तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र, या अपघातानंतर गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंब यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला […]
नवउद्योजकांनी ‘मार्जिन मनी’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या स्टँड अप […]










