मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फूट, यावर नवीन वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं, ज्यात त्यांनी स्पष्ट केलं की, “जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. आम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला.” त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक […]
टॅग: maharashtra government
महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची मंजुरी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जी गरीब कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा होतात. या योजनेला २०१४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती आणि जुलै महिन्यापासून योजनेची अंमलबजावणी सुरू […]
मंत्रिमंडळ विस्तार: नव्या मंत्र्यांचा शपथविधी, ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट
नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत […]
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आमच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला – अमित शाह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे […]
महाराष्ट्र शासनाच्या नऊ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई : नऊ वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.३२ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम […]
मॉलमध्ये लवकरच वाइनविक्री सुरू होणार? उत्पादन शुल्कमंत्र्याने दिले संकेत
मुंबई : राज्यातील मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, त्यावेळी भाजपने या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला निघाले असल्याची टीका केली होती. आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनीही मॉलमध्ये वाइनविक्रीला जोरदार विरोध केला होता पण आता राज्यातील […]
हरित लवादाचा मोठा निर्णय, महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड…
नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला पर्यावरण विषयक नियमांचं पालन न केल्यानं तब्बल १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल यांनी राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम १५ नुसार पर्यावरणाची हानी झाल्यानं आणि घन आणि द्रवरुप कचरा व्यवस्थापनातील सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचं पालन न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादानं […]
महाराष्ट्राला 12,000 कोटींचा दंड, कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे NGT ची कारवाई
नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) गुरुवारी महाराष्ट्र राज्याला घन आणि द्रव कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनासाठी पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून 12,000 कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हा आदेशही पारित करण्यात आला की घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी न्यायाधिकरणाची आवश्यकता आहे. न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल, न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि […]
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अखेर निलंबित
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी निलंबित केले. परमबीर आणि आणखी एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या डीजीपींना पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंह यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. अँटिलियाच्या बाहेर स्फोटके जप्त केल्यानंतर आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर परमबीर सिंग […]
पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर […]










