नवी दिल्लीः केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]
टॅग: महाराष्ट्र
ठाकरे सरकारकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. […]
मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील
मुंबई : भारतीय जनता पक्षाला आज (बुधवार) एक मोठा धक्का बसला आहे. कारण की, त्यांचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. जयंत पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला […]
महाराष्ट्रात एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांत तर दोन व तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांत मिळणार
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या मास्कचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाजवी दरात मास्क उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य झाले आहे. महाराष्ट्रात एन ९५ मास्क दर्जानुसार १९ ते ४९ रुपयांत तर दोन पदरी आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध होणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा; मदत जाहीर करणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष
उस्मानाबाद : बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. उस्मानाबादमधील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. […]
सचिन तेंडुलकरने कोरोनामुळे गमावला सर्वात जवळचा मित्र; ट्वीट करुन दिला आठवणींना उजाळा…
मुंबईः कोरोनाचा तडाखा क्रिकेट जगतासाठी आदरणीय असलेल्या मास्टरब्लास्टर सचिनला बसला. कोरोनामुळे सचिनने त्याचा अतिशय जवळचा मित्र गमावला. सचिन तेंडुलकरने स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. कोरोनामुळे मित्र गमावल्यामुळे सचिन प्रचंड दुःखी झाला. भावूक होत सचिनने ट्विटरवर मित्राविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या. सचिन ट्वीटमध्ये म्हणतो, ‘माझा प्रिय मित्र अवी कदम याचे निधन झाले. शाळेच्या दिवसांपासून अवी […]
आम्ही तिघांनाच राजे मानतो – प्रकाश आंबेडकर
पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उदयनराजे भोसले आमनेसामने आले असून, प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोडलेल्या टीकेला आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान उदयनराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात्तील वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली […]
या तारखे पासून सुरु होणार सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे
मुंबई : गृहमंत्रालायने अनलॉक ५ अंतर्गत गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. त्यामध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. यासंदर्भात ठाकरे सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सरकार यासंबंधीच्या निर्णयासाठी सकारात्मक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. “सिनेमागृहं सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. […]
कोरोनावर लस कधीपर्यंत येईल हे शरद पवारांनी केले स्पष्ट…
पुणे : कोरोनावर लस कधी येणार?. भारताचं आणि खासकरुन महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते सीरम इन्सिट्यूटच्या कोरोना लसीकडे ती कधी पर्यंत येणार?. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती शरद पवारांना दिली आहे. काल त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सीरम […]
पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी
बीड: धनंजय मुंडे यांनी आपण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळवून दिल्याचा दावा केला आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वतः प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा […]










