मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करत असताना सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा युवाकेंद्रित, शेतकरीहिताचा आणि सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणाल्या की, केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, […]
Sample Page
Budget 2026 मध्ये मोठा ट्विस्ट! काय होणार स्वस्त, काय महागणार जाणून घ्या..?
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असून, यामध्ये कररचना आणि सीमाशुल्क धोरणात महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले. काय जाहीर करण्यात आलं? अर्थसंकल्पीय भाषणात सीतारमण यांनी स्पष्ट केले की, देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी अनेक वस्तूंवरील सीमाशुल्क (Customs […]
उपमुख्यमंत्री अजित पवार मृत्यू प्रकरणात CID चौकशीचे आदेश, घटनास्थळ पूर्ण सील
पुणे/बारामती : बारामती विमानतळाजवळ कोसळलेल्या चार्टर्ड जेट दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांच्या मृत्यूची समांतर चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने गुन्हे अन्वेषण विभागाला (CID) दिले आहेत. ही दुर्घटना बुधवारी सकाळी घडली असून, गुरुवारी पहाटेच CID चौकशीस अधिकृत मान्यता देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (CID) सुनील रामानंद यांनी दिली. रामानंद म्हणाले, “बारामती तालुका […]
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन, बारामतीत घडली दुर्घटना
पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या धक्कादायक अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात त्यांच्या चार्टर्ड विमानाच्या लँडिंगच्या प्रयत्नात झाल्याचे पहिल्या अहवालांतून समोर येत आहे. उपमुख्यमंत्र्यांचे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते, तेव्हा लँडिंगच्या वेळी अचानक नियंत्रण सुटले आणि विमान अपघातग्रस्त झाले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी […]
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; हुंडा, चारित्र्यावर संशय, जबरदस्ती गर्भपात…
पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती मगर चौधरी (वय अंदाजे 30) यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात पती रोहन चौधरी, सासू सुनिता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल […]
पुणे हादरलं! आईकडूनच 11 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मुलीची प्रकृती चिंताजनक
पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. याच वेळी तिने 13 वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव सोनी संतोष जायभाय […]
निष्काळजीपणाचा कळस! विक्रोळीत स्पीकर अंगावर कोसळून 3 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली असून निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी विक्रोळी पूर्वेकडील टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात घडली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी रस्त्याच्या कडेला मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. घटनेच्या वेळी तीन वर्षांची मुलगी खेळत असताना, अचानक तो स्पीकर तिच्या […]
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल होत असून नागरिकांना थंडी, पाऊस आणि वाढत्या तापमानाचा एकाच वेळी सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जाणवणारी तीव्र थंडी आता हळूहळू ओसरत असून, त्याचबरोबर अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागांवर होणार आहे. […]
‘पुणे ग्रँड टूर’ने जिल्ह्याचा पर्यटन नकाशा जागतिक…!!
पुणे : दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जपणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक स्तरावर भारताची ओळख अधिक भक्कम करणे, हा यामागचा मूलभूत उद्देश आहे. पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नव्हे; तो संस्कृतीचा संवाद आहे, इतिहासाची ओळख आहे, निसर्गाशी नातं […]










