नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील युद्ध धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. खारकीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याने हल्ले तीव्र केले आहेत. रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून खारकीव्हमधील सुरक्षित ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. खारकीव्हमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीयांनी खारकीव्ह जवळील पिसोचिन, बेझलुडोव्हका आणि बाबे येथे जावे. परराष्ट्र मंत्रालयाने ही तिन्ही ठिकाणे सेफ झोन म्हणून घोषित केली असून नागरिकांना आज (युक्रेनियन वेळ) ६ वाजेपर्यंत या भागात पोहोचण्यास सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची माहिती दिली. युक्रेन सोडून जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे १७,००० भारतीय नागरिकांनी युक्रेनच्या सीमा सोडल्याचा अंदाज आहेत, असे ते म्हणाले.
The advisory that has just been issued by our Embassy is on the basis of information received from Russia. We would urge all our nationals to leave Kharkiv immediately to safe zones or further westwards using any means available, including on foot, & keeping safety in mind: MEA pic.twitter.com/3CuDIf1o5A
— ANI (@ANI) March 2, 2022
भारतीय हवाई दलाचे विमान C-17 बुखारेस्ट (रोमानिया) येथून ऑपरेशन गंगामध्ये सहभागी झाले आहे, हे विमान आज रात्री दिल्लीला परतणे अपेक्षित आहे. बुडापेस्ट (हंगेरी), बुखारेस्ट (रोमानिया) आणि रझेझो (पोलंड) येथून आज आणखी तीन उड्डाणे होणार आहेत. ज्यांनी भारतीय पासपोर्ट गमावले आहेत त्यांना आपत्कालीन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे, असे अरिंदम बागची यांनी सांगितले. मला वाटते की यामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत होईल. त्यांनी सांगितले की, युक्रेन सोडून जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे १७,००० भारतीय नागरिकांनी युक्रेनच्या सीमा सोडल्याचा अंदाज आहे.
भारताने ४ मार्चला ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनच्यामशेजारील देशांमधून ९ उड्डाणे भारतीयांना घेऊन भारतात पोहोचतील. आतापर्यंत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना १६ विमानांद्वारे मायदेशात आणण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याच्या योजनेला सरकारने वेग दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. जास्तीत जास्त भारतीयांना आणण्यासाठी एकूण फ्लाइट्सची संख्या वाढवण्यात आली आहे. युक्रेन सीमेवर अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ४ मार्चपर्यंत एकूण ३६ उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाइसजेटच्या ताफ्यातील आहेत.




