Harsimrat Kaur Badal resigns as Union Minister over Centre’s farm bills
देश राजकारण

मोदी सरकारसाठी मोठा धक्का; शेतकरीविरोधी अध्यादेश निषेधार्थ केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा

दिल्ली :  अकाली दलाच्या महत्त्वाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यामुळे एनडीएमध्ये मोठी खळबळ माजली आहे. संसदेत आणलेल्या कृषी संबंधी विधेयकाच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हरसिमरत कौर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा ट्विटरवरुन केली आहे. यासंबंधी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, शेतकरीविरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांसोबत त्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत उभं राहण्याचा मला अभिमान वाटतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत