ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचं आज (७ मे) कोरोनामुळे निधन झालं. शेष नारायण सिंह यांच्यावर ग्रेटर नोएडामधील जीआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. कालच त्यांना प्लाझ्मा थेरपी देखील देण्यात आली होती, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. आज सकाळी त्यांचं निधन झालं.
शेष नारायण सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरचे होते. गेली अनेक वर्षे ते हिंदी पत्रकारितेत योगदान देत होते. शेष नारायण सिंह यांचं निधन हिंदी पत्रकारितेसाठी मोठं नुकसान आहे. त्यांच्या निधनानंतर मीडिया जगतात शोककळा पसरली असून अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकारणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेष नारायण सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले कि, “ज्येष्ठ पत्रकार शेष नारायणसिंह जी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. पत्रकारितेच्या जगात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांची ओळख होती. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. ओम शांती!
वरिष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह जी का निधन अत्यंत दुखद है। पत्रकारिता जगत में अपने महत्वपूर्ण योगदान के लिए वे हमेशा जाने जाएंगे। दुख की इस घड़ी में उनके परिजनों के लिए मेरी संवेदनाएं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2021




