नवी दिल्ली : संसद भवनात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. येथील 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. 6-7 जानेवारीला सर्वांची कोरोना चाचणी झाली होती. देशात ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, ती खरोखरच चिंतेची बाब आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.
अनेक राज्यांमध्ये मंत्री आणि नेते ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 285 लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. तर 40,895 लोक बरे झाले आहेत. भारतातील 27 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनची एकूण 3,071 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,203 आहे.




