bridge river kanchi collapsed heavy rain cyclone yaas
देश

3 वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला, ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे आले समोर

झारखंड : रांचीमध्ये कांची नदीवर करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला आहे. हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. हाराडीह-बुधाडीह पूल गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मधून तुटला आणि कोसळला. हा पुल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू यांना जोडत होता. हा 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्याने दोन्ही बाजूचे गावकरी पुलाच्या दोन्ही बाजुला अडकले आहेत. तीन वर्षांपूर्वीच ग्रामविकास विभागाकडून 13 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या बांधकामाच्या वेळी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. पुलाचे खांब उभे करताना कोणतीही दाखल न घेता ते खांब दलदलीत उभे केले होते, ज्यामुळे पुलाचा पाया कमजोर होता. त्यातच हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच पूल कोसळण्याचे कारण नदीतून दररोज होणारे वाळूचे अवैध उत्खनन देखील असल्याचे सांगितले जात आहे. वाळू तस्कर पुलाच्या भोवती जेसीबी लावून वाळू उत्खनन करत असतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी पूल कोसळल्याची बातमी मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पाहणी केली. ते म्हणाले कि, “यापूर्वी देखील असाच एक उच्चस्तरीय पूल कोसळला असून दोन्ही पुलांचे बांधकाम करणारी कंपनी एकच आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई करायला हवी. अवैध वाळू उत्खननामुळे यापूर्वी देखील दोन पूल कोसळले आहेत. आता हा तिसरा पूल कोसळला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत