पालघर : प्रसूती दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने रक्तस्राव सुरु झाल्यानंतर २२ वर्षीय प्रिती जाधव यांना पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, ज्यामुळे तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.
मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान प्रिती जाधव यांना अति रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने सिल्वासा येथे हलवण्यात आले, परंतु रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध न झाल्यामुळे महिलेपर्यंत उपचार पोहोचण्यात उशीर झाला. अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृती गंभीर झाल्यामुळे सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान प्रिती जाधव यांचा मृत्यू झाला.
महिलेचे पती राहुल जाधव यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे पत्नीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. मात्र, डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.




