पुणे : राज्यात हिवाळ्याने यंदा नेहमीपेक्षा लवकरच हजेरी लावली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या तापमानात अचानक आणि तीव्र घट झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुष्टी केली आहे की काही भागांमध्ये किमान तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने खाली आले असून, विशेषतः पुणे आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात हिवाळ्याची ठळक चाहूल लागली आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, “फक्त ४-५ दिवसांत रात्रीचे तापमान ४ ते ६ अंशांनी घसरले आहे. त्यामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात आणि पुण्यात हिवाळा प्रभावीपणे सुरू झाला आहे. आयएमडीच्या विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ERF) नोव्हेंबर महिन्यात पावसाची शक्यता नाही. स्वच्छ आकाश आणि कोरडे उत्तरेकडील वारे या परिस्थितीला चालना देत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्दी आणि खोकल्यापासून विशेष काळजी घ्यावी.”
पुढील काही दिवस थंड, कोरडे राहणार
तज्ञांच्या मते, तापमानातील घट ही निरभ्र आकाश, कमी आर्द्रता आणि उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे झाली आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, सकाळी स्वच्छ हवामान आणि रात्री थंड वातावरण अनुभवायला मिळेल.
नागरिकांना सूचना
पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि राज्यातील इतर भागांतील नागरिकांना उबदार राहण्याचा, विशेषतः पहाटेच्या वेळी थंडीपासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सर्दी, खोकला आणि हंगामी आजारांपासून सावध राहण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.




