Six killed in car-truck accident on Agra-Lucknow road
अहिल्यानगर महाराष्ट्र

बारावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

अहमदनगर : बारावी परीक्षेचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. सागर बबन लष्करे (रा. गोरेगाव, ता. पारनेर) व किरण बाबासाहेब ठुबे (रा. कान्हूरपठार, ता. पारनेर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बारावीचा पेपर देऊन पारनेर तालुक्यातील दोन विद्यार्थी आष्टी येथून त्यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलच्या समोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तात्काळ या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत