an accident

आंबोली घाटात भीषण अपघात, ओव्हरटेक करताना ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

महाराष्ट्र

सिंधुदुर्ग : आंबोली घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार समीर शशिकांत जाधव (रा. वेताळ-बांबर्डे, ता. कुडाळ) जागीच ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली नाना पाणी वळणावर झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अपघाताबाबत मुबारक हुसेन शेख (वय ४२) या ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर आंबोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मुबारक शेख हे ट्रक घेऊन रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून भरधाव आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट ट्रकच्या खाली आली. यावेळी ट्रकचे चाक समीर जाधव याच्या शरीरावरून गेले. यात समीरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार समीर जाधव याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. तसंच दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून डोळ्यासमोरच मित्राचा इतका भयंकर मृत्यू बघितल्याने त्याला मानसिक धक्का बसला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई आणि सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत