लातूर : लातूर चे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गायकवाड यांनी जानेवारी २०१८ च्या लोकसभा अधिवेशनात टेंभुर्णी ते लातूर हा राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गात परिवर्तन करून लवकरात लवकर महामार्गाचे काम सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून टेंभुर्णी – लातूर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी टेंभुर्णी ते लातूर महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे महाराष्ट्र चे तत्कालीन सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे जाहीर आभार मानले आहेत.
thank you PM sir pic.twitter.com/3SJNIDp0Sy
— Dr Sunil Baliram Gaikwad (@SunilbgaikwadMP) November 14, 2021
या महामार्गामुळे मुंबई, पुण्याहून लातूर, नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना खूप सोयीचे होणार आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे अनेकजणांनी माजी खासदार डॉ गायकवाड यांचे आभार मानले आहेत.




