15 killed in wall collapse due to landslide in mumbais chembur
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू, मदत व बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातलं असून चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता ही घटना घडली. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. एक झाड भिंतीवर पडल्यानंतर भिंत कोसळली. यातील मृतांची संख्या आता १2 वर पोहोचली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, भिंतीचा ढिगारा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. आतापर्यंत 16 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.

हवामान खात्याकडून आजदेखील मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच लोकांना समुद्रापासून दूर रहाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत